खोट्या आरोपांचे ओझे खूप दिवस वाहिले,
विश्वासघाताचे विषही मुकाट्याने पचविले.
हळव्या मनाला कठोर बनवणे अपरिहार्य झाले आहे,
जे जसे वागले, त्यांना तसेच उत्तर देण्याचा विचार आहे
सहनशीलतेला अनेकांनी कमजोरी समजली,
मौनालाच हार समजून किंमतच विसरली.
आता ना माफी, ना खोट्या नात्यांचा आधार,
स्वाभिमानासाठीच उभा आहे माझा प्रत्येक विचार.
✒️ K. Satish












